२०१३:
उत्तराखंड ढगफुटी - केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पाऊसामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, यात किमान ६ हजार लोकांचे निधन. ही २००४ च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती आहे.
२०१२:
शेन्झोऊ ९ अंतराळयान - चीनने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
२०१०:
भूतान - देश तंबाखूवर पूर्णपणेबंदी करणारा हा जगातील पहिला देश बनला.
१९९०:
मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.
१९७७:
ओरॅकल कॉर्पोरेशन - कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) म्हणून सुरु झाली.
१९६३:
व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा - या अंतराळ प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळयात्री बनल्या.
१९४७:
नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठाचेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
१९१४:
लोकमान्य टिळक - यांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका.
१९११:
इंटरनॅशनल बिझनेस मशीनस् कॉर्पोरेशन (आय. बी. एम.) - कंपनीची कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग म्हणून सुरवात झाली.
१९०३:
फोर्ड मोटर - कंपनीची सुरवात.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024