१९७९:— दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे १.५ बिलियन डॉलर्सची मागणी केली.
१९७८:— मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
१९५३:— निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.
१९३१:— दुसऱ्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९२३:— इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
१९०६:— बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
१८२२:— ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
१८१४:— दुसऱ्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.
१६७९:— सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
१६३०:बाेस्टन, अमेरिका— बोस्टन गाव म्हणून प्रस्थापित करण्यात आले.
जन्म
१९३३:इला भट्ट— भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार
(निधन: २ नोव्हेंबर २०२२
)
१९१७:जॉन कॉर्नफॉथ— ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
(निधन: ८ डिसेंबर २०१३
)
१८८७:गोपीनाथ कविराज— भारतीय संस्कृत विद्वान — पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
(निधन: १२ जून १९७६
)
१८४९:बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर— हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक
(निधन: ८ फेब्रुवारी १९२७
)
१८२२:भाऊ दाजी लाड— प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ
(निधन: ३१ मे १८७४
)
१७९१:उमाजी नाईक— भारतीय आद्द क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक
(निधन: ३ फेब्रुवारी १८३२
)
निधन
१९७९:जे. जी. नवले— कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक
(जन्म: ७ डिसेंबर १९०२
)