२०००:— अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
१९५७:— कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.
१६७९:— राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.
१६६३:— दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्न करताना त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत जिवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रुढ झाला.
जन्म
१९८१:मायकेल ए. मन्सूर— अमेरिकन नाविक — सन्मान पदक
(निधन: २९ सप्टेंबर २००६
)
१५४९:राजकुमारी एलिझाबेथ— स्वीडनच्या राजकुमारी
(निधन: २० नोव्हेंबर १५९७
)
निधन
२००५:शौल बेलो— कॅनेडियन-अमेरिकन कादंबरीकार, निबंधकार आणि लघुकथा लेखक — नोबेल पुरस्कार
(जन्म: १० जुन १९१५
)