सुविचार — सध्याची विद्यापीठे अति कुशल असली तरीही असंस्कृत तरुणांचे तांडे निर्माण करीत आहे कारण तरुणांच्या पुढे जीवन मूल्याची चौकट ठेवली जात नाही खरं… (लेखक: स्टीवन प्रेसिडेंट जॉन्स हॉकिन्स युनिव्हर्सिटी)
सुविचार — तीन गोष्टीतून आपण विद्वता मिळवू शकतो त्या म्हणजे उदांत बाबीचा संचय सहज सोप्या कल्पना आणि कटू अनुभव (लेखक: कन्फ्यूशियस)
सुविचार — सध्याची विद्यापीठे अति कुशल असली तरीही असंस्कृत तरुणांचे तांडे निर्माण करीत आहे कारण तरुणांच्या पुढे जीवन मूल्याची चौकट ठेवली जात नाही खरं… (लेखक: स्टीवन प्रेसिडेंट जॉन्स हॉकिन्स युनिव्हर्सिटी)
सुविचार — तीन गोष्टीतून आपण विद्वता मिळवू शकतो त्या म्हणजे उदांत बाबीचा संचय सहज सोप्या कल्पना आणि कटू अनुभव (लेखक: कन्फ्यूशियस)
२०००:— अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
१९५७:— कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.
१६७९:— राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.
१६६३:— दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्न करताना त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत जिवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रुढ झाला.