१७ नोव्हेंबर घटना
- १९९६ — पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल ऍ ॅकेडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून निवड.
- १९९४ — रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेऱ्या पूर्ण करून नवा विक्रम केला.
- १९९२ — देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.
- १९९२ — महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.
- १९५० — ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.
- १९३३ — अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.
- १९३२ — तिसऱ्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
- १८६९ — भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणाऱ्या सुएझ कालव्याचे उद्
 घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.
- १८३१ — ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्
वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.