१९९६:
पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल ऍ ॅकेडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून निवड.
१९९४:
रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेऱ्या पूर्ण करून नवा विक्रम केला.
१९९२:
देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.
१९९२:
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.
१९५०:
ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.
१९३३:
अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.
१९३२:
तिसऱ्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१८६९:
भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणाऱ्या सुएझ कालव्याचे उद्
घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.
१८३१:
ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्
वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024