२०१२:
राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार.
२०११:
लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.
२००५:
कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
१९९७:
हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.
१९९१:
वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.
१९९०:
आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
१९६६:
लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.
१९४२:
दुसरे महायुद्ध - स्टालिन ग्राडची लढाई सुरू.
१९१४:
पहिले महायुद्ध - जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025