२०१०:— भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.
१९९९:— पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.
१९९४:— राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान.
१९७१:— झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९४५:— मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू.
१९४२:— दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.
१९२४:— अडोल्फ हिटलर यांची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.