१४ ऑगस्ट घटना
-
२०१०: — पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.
-
२००६: — श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यातचेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.
-
१९७१: — बहारीनला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
-
१९५८: — एअर इंडियाची दिल्ली - मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
-
१९४७: — पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
-
१९४५: — दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.
-
१९४३: — नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.
-
१८९३: — मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.
-
१८६२: — कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना.
-
१६६०: — मुघल फौजांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला.