२००६:
सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.
२००३:
जळगाव महानगरपालीकेची स्थापना.
२०००:
फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.
१९९०:
नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९८०:
अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
१९७७:
भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
१९३५:
शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.
१८७१:
ऑटो व्हॉन बिस्मार्क हे जर्मनीचा चॅन्सेलर बनला.
१८५८:
इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनीझाशीस वेढा दिला.
१६८०:
शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.
१५५६:
ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणाऱ्या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024