२०११:
मुंबई बॉम्बस्फोट - मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत किमान २६ लोकांचे निधन तर किमान १३० जण जखमी.
१९८३:
श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तामिळ व्यक्तींची हत्या. ४,००,००० हून अधिक तामिळींचे पलायन.
१९७७:
रोहित्रावर वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला.
१९५५:
२८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.
१९२९:
जतिंद्रनाथ दास - यांनी लाहोर तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचे निधन झाले.
१९०८:
ऑलिम्पिक स्पर्धा - स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
१८३७:
बकिंगहॅम पॅलेस, इंग्लंड - राणी व्हिक्टोरिया यांनी या पॅलेसमध्ये अधिकृतपणे राहण्यास सुरवात केली, तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजा-राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.
१६६०:
मराठा साम्राज्य - पावनखिंडीतील लढाई.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024