सुविचार
प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.
परस्परात प्रेम असणे हाच खरा स्वर्ग
वाचनाने मनुष्यास पूर्णत्व येते सल्लामसलतीने मनुष्य तत्पर बनतो आणि लिखाणाने मनुष्य तंतोतंत बनतो
देशाची सुधारणा करायची असेल तर प्रथमता विद्यार्थ्यांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे
आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा शेवटचा आहे असे समजून घालवावा म्हणजे आयुष्य आनंदमय होईल
सध्याची विद्यापीठे अति कुशल असली तरीही असंस्कृत तरुणांचे तांडे निर्माण करीत आहे कारण तरुणांच्या पुढे जीवन मूल्याची चौकट ठेवली जात नाही खरं म्हणजे ते अशा आधाराचा अधिकाधिक शोध घेत असतात
खरा धर्म हा दुर्बल आणि दुर्दम्य आसक्तींना घालून मन निर्मळ करतो
प्रामाणिकपणा आणि अप्रमाणिकपणा या दोन्ही सवयी सरावानेच आत्मसात होणाऱ्या आहेत
मूर्ख लोकांमध्ये एक विचित्र पद्धतीचा आत्मविश्वास असतो ज्याचा उगम त्यांच्या अज्ञानातच आढळतो कुठलीही गोष्ट योग्यरीत्या करण्याची इच्छा नसणे हे त्या गोष्टीच्या अज्ञानापेक्षा लाजिरवाणी होय
सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो जी माणसे आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्यांना जग सलाम करते आणि जी मोजकीच माणसं आपल्या पूर्ण क्षमतेने म्हणजे शंभर टक्के काम करतात त्यांना जग डोक्यावर घेते
पाशाही मनुष्याच्या मनोवृत्तीचा व हृदयवृत्तिचा उद्गार होय