सुविचार
प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.
भिंतीवरचा नकाशा वाऱ्याने हल्ला म्हणजे जगाचा भूगोल बदलत नाही
जे शहाणपण माणसाला त्याच्या तारुण्यात मिळणे आवश्यक असते ते शहाणपण त्याला त्याच्या वृद्धावस्थेत अगदी शेवटी शेवटी सुचते हीच मानव जातीची खरी शोकांतिका होय
वक्त्याचे विचार सखोल नसतील तर ते भाषणाची लांबण लावून त्याचे भरपाई करण्याचा प्रयत्न करतात
सामर्थ्य हे कळकळीच्या सेवेमधून निर्माण होते
जेव्हा संतोष रुपी धन तुम्हाला प्राप्त होते तेव्हा इतर गोष्टी कचऱ्याप्रमाणे तुच्छ वाटतात
शिक्षणाचा खरा अर्थ मनातील अज्ञानाची भीती दूर करून सुसंस्कृत समाज निर्मिती हाच आहे
सुख हे अत्तराच्या सुगंधाप्रमाणे आहे जे दुसऱ्यावर शिंपडले असता स्वतःवरही शिंपडले जाते
ज्याला सत्य कळले नाही तो मूर्ख होय आणि ज्याला सत्य कळले पण जो ते कबूल करत नाही तो गुन्हेगार होय
उठा कामाला लागा हे जीवन आणखी किती दिवस टिकणार आहे जन्माला आलाच आहात तर काहीतरी महत्त्व कार्य करून जा नाहीतर तुमच्यात आणि वृक्ष पाषाणात फरकतो काय तेही अस्तित्वात येतात जगतात आणि नष्ट होतात
माणूस ही एकमेव निर्मिती अशी आहे जी आपण जसे आहोत तसे नाकारते