सुविचार
प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.
समता हाच आजच्या युगाचा जन्म आहे याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे
विचाराची ज्योती मालविली तर आचार आंधळा बनेल
तुम्ही काल केलेले सत्कृत्य आज विसरून जा आज करायचे सत्कृत्य उद्यावर टाकू नका
आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळ्यात असतात
विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार
कुष्ठरोग किंवा क्षयरोग मोठा रोग नव्हे तर आपण नकोसे झाले आहोत ही भावना हाच आजचा खरा मोठा रोग आहे
आळस अज्ञान व अंधश्रद्धा हे माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत
मोठमोठी कामे ही ताकदीने केली जात नाही तर ती सहनशक्तीनेच होतात
शिक्षकास पूर्वी आचार्य म्हणत आचार्य म्हणजे आचारवान स्वतः आदर्श जीवन आचरण राष्ट्राकडून नाही तसेच करून घेणारा तो आचार्य अशा आचार्याच्या कर्तुत्वानेच राष्ट्र निर्माण झाली आहेत हिंदुस्थानाची नवी घडी बसवायची आहे त्यासाठी राष्ट्रनिर्मितीचे मोठे कार्य आपल्यापुढे आहे
कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण आहे