सुविचार — अपयश म्हणजे आपला दोष नव्हे योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत अनेक अपयशातून यशाची निर्मिती होते (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
सुविचार — अपयश म्हणजे आपला दोष नव्हे योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत अनेक अपयशातून यशाची निर्मिती होते (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
२०२२:लुडिंग काउंटी भूकंप— लुडिंग काउंटी, सिचुआन, चीन मध्ये ६.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात किमान ६६ लोकांचे निधन तर किमान २५० जण जखमी झाले.
२००५:— इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट ०९१ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.
२०००:— ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९८४:— एस. टी. एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
१९७७:— व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
१९७५:— अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला.
१९७२:— ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिंपिकमधील इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.
१९७०:— इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.
१९६७:— ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.
१९६१:— अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.
१९६०:— रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.
१९४१:— इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.
१९३२:— बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.
जन्म
१८८८:डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन— भारताचे २रे राष्ट्रपती — भारतरत्न
(निधन: १७ एप्रिल १९७५
)
निधन
१९९१:शरद जोशी— हिंदी कवी, लेखक व उपहासकार
(जन्म: २१ मे १९३१
)